त्याग
कर्तव्याला ति प्राधान्य देते
कुकर्म किंवा निष्कर्माला नाही,
दुसऱ्यांसाठी जगते ति नेहमी
स्वतः साठी मात्र काही करत नाही
म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही ......
मनावर ठेवते संयम स्वतःच्या
इच्छा आकांशा कधी दाखवत नाही ,
निस्वार्थ मनाने कार्य करते
तिचा स्वार्थ मात्र बाळगत नाही
म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही ......
जुन्या इमारती सारखी उभी असते
जुन्या इमारती सारखी उभी असते
ती आज रचलेल्या पायांसारखी नाही
मिळो ना मिळो केवळ वाट पाहते
ती मिळावं अशी अपेक्षा ठेवत नाही .
म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही ......
दैवी गुण असावी ती कि निसर्गाने दिलेली भेट
मनुष्याने निर्माण केलेला कायदा किंवा नियम नाही
सर्व गुणांमध्ये सर्व श्रेष्ठ सद्भावना आहे ती
कोणाची रचना किंवा कोण्या कवीची कविता नाही
म्हणुनच त्याग कधी वाया जात नाही .......
- भावना राऊत
- भावना राऊत
-
खुपच छान
ReplyDeleteDhanyawad
ReplyDelete