बालपणपाखरां सारख स्वच्छंद फिरण
भवऱ्या सारख चोहीकडे बागडण
मनसोक्त दिवसभर खेळत बसण
तरी फुलांसारखं टवटवीत राहण
खरंच आठवत ते बालपण ...
शाळेत जायला नको म्हणुन रडणं
गेल्यावर मात्र तेथेच रमुन जाण
स्वतः चा डबा स्वतः कधी न खाणं
मैत्रिणी च्या डब्याशी अदलाबदल करणं
खरंच आठवत ते बालपण ...
आईच्या कुशीत झोपायला भावाशी भांडण
बाबांच्या छडी पाहुन येत होतं अंगी वळण
त्या वेळेस असे वाटे कधी येईल मोठेपण ?
आता देवाला म्हणते पुन्हा देशील का ते जीवनखरंच आठवत ते बालपण ...
- भावना राऊत
CHAN
ReplyDelete